राज्यात पावसाचा प्रभाव कमी झाला

राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस पडल्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या दोन दिवसानंतर पावसाचा जोर आणखी कमी होणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस पडेल. मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप राहणार आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
The effect of the rain diminished
The effect of the rain diminished

पुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस पडल्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या दोन दिवसानंतर पावसाचा जोर आणखी कमी होणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस पडेल. मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप राहणार आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

बंगालचा उपसागराच्या परिसरात चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती उत्तरेकडे पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची तिव्रता अधिक नसल्याने दोन दिवसात ते विरून जाण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्राच्या पश्चिममध्य भागात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र अजूनही काही प्रमाणात सक्रिय आहे. त्यामुळे राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या दोन दिवसात राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होऊन कडाक्याचे ऊन पडेल. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा काहीसा वाढणार असून उन्हाचा चटका वाढेल.  

राज्यात कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. खानदेशातील धुळे, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर  जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. इतर भागात काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी शिडकावा होईल. शुक्रवारी (ता. २३) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर शनिवारपासून राज्यातील सर्वच भागात पावसाची उघडीपीसह काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.

परतीच्या मॉन्सूनची झारखंड, बिहार, सिक्कीममधून माघार पंधरा दिवसांपूर्वी गुजरात, मध्य प्रदेश व अरबी समुद्र या भागातून परतीच्या मॉन्सूनने माघार घेतल्यानंतर काही दिवस रेंगाळला होता. मात्र, बुधवारी उत्तर प्रदेशातील बहुतांशी भाग, बिहारचा काही भाग, पश्चिम बंगालचा उत्तरेकडील भाग, सिक्कीम, झारखंड, उत्तर छत्तीसगड, मध्य प्रदेशातील संपूर्ण भागातून माघार घेतली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत आणखी माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे झारखंड, गुजरात, ओडिसाचा काही भाग व उत्तर महाराष्ट्रातून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात बाष्प कमी होत असून कोरडे वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com