वातावरणातील घटकांचे ज्या प्रमाणे मानवावर परिणाम होतात, त्या प्रमाणेच ते किटक व रोगकारक सूक्ष्मजीवांवरही होत असतात. पिकांच्या उत्पादनामध्ये रोग किडींमुळे होणारे नुकसान स्पष्ट दिसून येते. कोणत्याही सजीवाला किंवा वनस्पती होणारा रोग हा जिवाणू किंवा विषाणूंच्या माध्यमातून होत असतो. या सूक्ष्मजीवांच्या प्रादुर्भाव आणि वाढीचा वेग हा अनेक वेळा वातावरणातील अनेक घटकांवर अवलंबून असतो. वातावरणाचे ऋतुचक्र बदलल्यास त्याचा परिणाम या घटकांवर होत असतो. आंतरराष्ट्रीय वातावरण बदल समिती (आयपीसीसी), भारतीय राष्ट्रीय वातावरण बदल समिती (आयएनसीसी) , भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था (आयआयटीएम) यांच्या मार्फत वातावरणातील ऋतुचक्रासोबत त्याच्या होणाऱ्या विविध घटकांवरील परिणामांचा अभ्यास केला जातो. पिकावरील अभ्यासासाठी कृषी विद्यापीठामध्ये कृषी हवामानशास्त्र विभाग आहेत. या विभागामध्ये स्थानिक हवामान बदल आणि पिकांवरील रोग किडी यांतील परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. महाराष्ट्रातील वातावरणामध्ये घडलेले बदल गेल्या शंभर वर्षामध्ये राज्यातील वातावरणामध्ये फारसा बदल झालेला नाही. अलीकडच्या तीस वर्षामध्ये हवामानातील बदलांचे आपल्या राहणीमानावर, शेतीवर, शेतीपूरक व्यवसायावर होताना दिसत आहेत. त्यातील रोग किडींवरील परिणामांचा विचार या लेखामध्ये आपण करणार आहोत.
सूक्ष्म वातावरण आणि रोगकीड परस्पर संबंध पृथ्वीतलावर वाढणाऱ्या सजीवांसह वनस्पतींमध्ये रोगास कारणीभूत सूक्ष्मजीव (जिवाणू किंवा विषाणू) आणि कीटक उपलब्ध असतात. कोणत्याही रोग किडीस सूक्ष्म वातावरणीय पातळीची आवश्यकता असते. या सूक्ष्म वातावरणाची पातळी परिसरातील हवामानावर अवलंबून असते. रोगकिडीचे जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वातावरणातील घटकांसोबत कमाल आणि किमान मरणोक्त वातावरण घटक निश्चित असतात. हे सूक्ष्मजीव कार्यरत राहण्यासाठी कमाल व किमान कार्यरत वातावरणीय घटक, सुयोग्य वातावरण या तीन पातळीवरील हवामान घटकांचा समावेश होतो. सुयोग्य वातावरण घटक पातळी यामध्ये सरासरीहून किमान व कमाल वातावरण घटकांच्या उपलब्धीमध्ये रोग किडींची वाढ, विकास आणि प्रसार झपाट्याने होतो. कधी कधी हे रोग अथवा कीड नियंत्रणाबाहेर जाऊन त्याचा उद्रेक होतो. यातून कधी स्थानिक पातळीवरील उद्रेक (इनडेमिक), तर कधी साथ किंवा महामारी (पॅनडेमिक) मध्ये त्याचे रूपांतर होते. कमाल व किमान कार्यरत पातळी या वातावरणीय पातळीमध्ये रोगकिडीची वाढ व विकास दर कमी होत जातो. नंतर तो पूर्णतः कमाल व किमान हवामान घटकांच्या अंतिम पातळीवर येऊन थांबतो. शून्यावर येतो. यानंतर त्याची वाढ पूर्णपणे थांबते. अधिकतम व न्यूनतम मरणोक्त पातळी कमाल व किमान हवामान घटकांच्या अंतिम मर्यादेत वाढ झाल्यास, पातळी ओलांडल्यास रोग कीड समूळ नष्ट होत नाही. त्याची वाढही होत नाही. ते सुप्तावस्थेत जातात. आणखी कमाल किंवा किमान हवामान घटकात वाढ झाली तर समुळ नष्ट होतात किंवा कमाल, किमान पातळीच्या आत वातावरणीय घटक आल्यास पुन्हा यांची वाढ आणि विकास होण्यास प्रारंभ होतो. रोगकिडींचा वातावरणाशी परस्पर संबंध रोग किंवा किडीच्या प्रादुर्भाव व प्रमाण वाढण्याची खालील अजैविक कारणे आहेत.
तापमान अधिक असल्यास रोगनाशक किंवा कीटकनाशकांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी शेतकऱ्यांकडून ती शिफारशीपेक्षा अधिक वापरली जातात. त्यातून आणखी प्रतिकारशक्ती तयार होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत आणखी घट होते.
रोगकीडींचा उद्रेक होण्यामागे अन्य काही गोष्टी असल्या तरी बदललेले वातावरण हे मुख्य कारण आहे.
संपर्क - डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (सहाय्यक प्राध्यापक, कृषी हवामानशास्त्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.