‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू

नांदेड: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोदावरी नदीवरील बाभळी प्रकल्पाचे दरवाजे २९ आक्टोबरपर्यंत उघडेच ठेवावे लागतात.
Efforts are underway to stop the flow of water in the Babhali
Efforts are underway to stop the flow of water in the Babhali

नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोदावरी नदीवरील बाभळी प्रकल्पाचे दरवाजे २९ आक्टोबरपर्यंत उघडेच ठेवावे लागतात. मात्र, यंदा दमदार पाऊस झाल्यामुळे तसेच तेलंगणातील पोचमपाड प्रकल्पही शंभर टक्के भरल्यामुळे या प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या प्रधान सचिवांमध्ये पत्रव्यवहार आणि चर्चाही झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीवर बाभळी बंधारा आहे. या प्रकल्पात २.७४ टीएमसी (५६ दलघमी) पाणीसाठा होऊ शकतो. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीसाठा होऊ शकला नाही. यंदाच्या वर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यातील गोदावरी आणि तिच्या उपनद्यावर असलेले जायकवाडीपासून ते नांदेड जिल्ह्यातील बळेगाव बंधाऱ्यापर्यंत सर्व प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यामुळे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

बाभळी बंधाऱ्यात पाणी अडविण्याबाबत नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्यासह राज्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांपर्यंत पत्रव्यवहार व चर्चा केली.  नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करून तसेच तेलंगणातील संबंधित विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार कार्यवाही देखील झाली. राज्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आणि तेलंगणातील प्रधान सचिव यांच्यात पत्रव्यवहार आणि चर्चाही झाली आणि ती सकारात्मक झाली आहे. त्यामुळे आता याबाबतच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे. 

तेलंगणातील पोचमपाड धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पाणी वाया जाऊ नये, यासाठी बाभळी बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी परवानगी मागण्यात आली आली आहे. यंदाच्या वर्षी पोचमपाड धरणात आत्तापर्यंत पाच हजार ३११ दलघमी तर पोचमपाड धरणातूनही तीन हजार ६१६ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात आली. - एस. के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com