कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू ः सुनील तटकरे

मुंबई: सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. त्याच धर्तीवर कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बुधवारी (ता. १) चर्चा केली.
Efforts for Konkan mango growers started: Sunil Tatkare
Efforts for Konkan mango growers started: Sunil Tatkare

मुंबई : सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. त्याच धर्तीवर कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बुधवारी (ता. १) चर्चा केली. 

‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे गेले काही दिवस कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे, अडचणीत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा पणन विभागाच्या वतीने वर्गवारीने, किफायतशीर दराने आंब्याची खरेदी करावी. आंब्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना कॅनिंगमार्फत हा आंबा पुरवावा. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी हे कारखाने पडेल दराने आंबा शेतकऱ्यांकडून उचलत असतात, यंदा तो आत्ताच किफायतशीर दराने त्यांना द्यावा. शिवाय निर्यात करणे शक्य असेल तर त्यासाठीही प्रयत्न करावेत, अशीही मागणी श्री. तटकरे यांनी केली.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांना लवकरच दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे असेही श्री. तटकरे यांनी सांगितले. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक धाडसी निर्णय घेतला आहे, असेही तटकरे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com