रत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणी

रत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणी
रत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणी

रत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कोणतेही धरण धोकदायक नसल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने दिला आहे. परंतु, काही प्रमाणात गळती असलेल्या आठ धरणांची नाशिक येथील धरण सुरक्षितता संघटनेतर्फे तपासणी करण्यात येईल’’, अशी माहिती कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी दिली.

तिवरे धरण फुटल्यामुळे २२ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी करण्याचे आदेश शासनाने पाटबंधारे विभागाला दिले. त्यानुसार पूर्ण झालेल्या सर्व धरणांच्या पुनःश्‍च तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. तपासणी करण्यासाठी सुधारित तपासणी सूची देण्यात आली होती. यामध्ये माती धरणाच्या भरावामधून गळती होते का? भराव खचत आहे का?, सांडवा, दगडी धरणात गळती, माती भराव सांडव्याच्या जोडातील गळती, फाउंडेशन गलरी, विमोचन बांधकामातून गळती, विमोचकाभोवतीचा माती भराव सुस्थितीत आहे का?, विद्युतपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा आहे का? आदींची पाहणी करण्यात आली. 

तपासणी मोहिमेत कोणतेही धरण धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु, आठ धरणांमध्ये पाण्याचा पाझर होत असल्याने या धरणांची तपासणी करण्याचे पत्र रत्नागिरी पाटबंधारे विभागाने धरण सुरक्षितता संघटनेला दिले. या आठ धरणांमध्ये निवे, कोंडीवली, मोरवणे, तेलेवाडी, खेम, साखरपा, तणवडे, टांगर या धरणांचा समावेश आहे. या धरणांच्या ठिकाणी दोन कर्मचारी कायमस्वरूपी पाहणी करण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. खेम धरणावर केमिकल ग्राउटिंग करण्यात येणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या एका पथकाने पाहणी केली असल्याचे जगदीश पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com