शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ लाख नवे शेतकरी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हेक्टरची अट सरकारने रद्द केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थी संख्येत भर पडणार असून सुमारे ७ लाख ९५१ शेतकऱ्यांच्या नोंदी नव्याने होतील असा अंदाज आहे. या सर्व लाभार्थ्यांची नोंदणी ३० जूनपूर्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हाधिकारी रोहयो सुशांत बनसोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप आदी उपस्थित होते. नव्या निर्णयानंतर पात्र लाभार्थी आणि अपात्र लाभार्थी यांचे निकष नव्याने जारी केले आहेत. महसूलकडील नोंदीनुसार जिल्ह्यातील एकूण ८ अ प्रमाणपत्रांची संख्या ८ लाख ७ हजार १६८ आहे. क्षेत्रमर्यादा हटविल्याने शेतकऱ्‍यांच्या नोंदी नव्याने होणार आहेत.

पात्र लाभार्थ्यांची नावे, खाते क्रमांक, आधार वापर आणि आयएफसीआय कोडसह बँकेतील खाते क्रमांक यांची नोंदणी ३० जूनपूर्वी आवश्यक आहे. लाभार्थ्यांची माहिती परिशिष्ट अ (२१ रकाने) ते परिशिष्ट ड पर्यंत घेऊन त्याची डाटा एन्ट्री करायची आहे. कमी कालावधी आणि मनुष्यबळाची कमतरता या पार्श्वभूमीवर सर्व संबधितांनी यास प्राधान्य द्यावे आणि  शासनाच्या धोरणानुसार थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात मिळण्याच्या दृष्टिकोनातून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com