अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुल

अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुल
अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुल

अमरावती  ः जिल्ह्यात एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ५२६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सोमवार (ता. २४) पासून या ग्रामपंचायतींच्या हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली असून, मतदान २९ मार्च रोजी होणार आहे.  ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदार यादीचा कार्यक्रम सर्व ग्रामपंचायतींमध्ये ५ फेब्रुवारीपासून राबविण्यात आला. २४ फेब्रुवारीला अंतिम यादी जाहीर करण्यात आली. सोमवारी (ता. २४) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच ५२६ ग्रामपंचायतींच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल लागेपर्यंत ती कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. गुरुवारी (ता. २७) तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल. त्यानंतर ६ ते १३ मार्च या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. १६ मार्च पर्यंत अर्ज मागे घेता येईल तर १८ मार्च रोजी चिन्ह वाटप तर २९ मार्च रोजी मतदान व ३० मार्चला मतमजोणी होईल, असे सांगण्यात आले. 

तालुकानिहाय ग्रामपंचायती अमरावती - ४६, तिवसा - २७, भातकुली -३४, चांदूररेल्वे - २८, धामणगाव - ५३, नांदगाव खंडेश्‍वर -४४, दर्यापूर - ४८,धारणी - ३२ चिखलदरा -१७, चांदूरबाजार -४१, अचलपूर - ४२, मोर्शी -३९, वरुड- ४१, अंजनगाव - ३४, एकूण -५२६ सरपंच निवडीची उत्सुकता भाजप सरकारच्या काळात जनतेमधून सरपंच निवडीचा निर्णय घेण्यात आला होता. महाविकास आघाडीने हा निर्णय फिरविला. परंतु, राज्यपालांनी त्यास मंजुरी न दिल्याने या वेळी सरपंचाची निवड नेमकी कोणत्या पद्धतीने होते, याविषयीची उत्सुकता वाढीस लागली होती. निवडणूक आयोगाने मात्र १३ ऑगस्टच्या शासन अधिसूचनेनुसार जनतेमधूनच सरपंच निवडला जाणार असल्याचे सांगत यावर पडदा टाकला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com