दुष्काळी उपाययोजनांना निवडणूक आयोगाची परवानगी

दुष्काळी उपाययोजनांना निवडणूक आयोगाची परवानगी
दुष्काळी उपाययोजनांना निवडणूक आयोगाची परवानगी

मुंबई : राज्यातील दुष्काळाच्या निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यास आणि त्यासाठी आवश्यक बैठका घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला परवानगी दिली आहे. त्यासाठी निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याचे आयोगाने राज्याला कळवले आहे. ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया संपली आहे, त्या भागांत पाणीपुरवठा योजनांना मंजुरी किंवा दुरुस्ती आणि अन्य कामे करण्यास आयोगाची कोणतीही हरकत नाही, मात्र याचा राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टीने अवास्तव प्रसिद्धी करता येणार नाही, अशी सूचनाही निवडणूक आयोगाने शासनाला केली आहे.

राज्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता तातडीने उपाय योजण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. राज्यात उन्हाच्या झळा असून, दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. विहिरी खणणे, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, कॅनालची देखभाल इत्यादी कामे ही तीव्र उन्हाळ्यातच करावी लागतात. राज्य सरकारने १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com