पंढरपूर, जि. सोलापूर ः राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाऱ्या साखर कारखानदाराला उमेदवारी देताना आम्हाला विचारात घेतले नाही. भाजपनेही पैसे बडुवणाऱ्याला उमेदवारी दिली. निवडणूक रिंगणातील दोन्ही उमेदवार साखर कारखानदार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले आहेत. त्यांच्याकडे निवडणूक लढायला पैसे आहेत. पण शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यासाठी नाहीत, हे दुर्दैव आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, राजू शेट्टी यांनी येथे केली.
रविवारी (ता. ४) पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी राजू शेट्टी पंढरपुरात आले आहेत. सकाळी संत नामदेव पायरीजवळून त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीविषयी रोष व्यक्त केला.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, राज्य साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे एफआरपीचे सुमारे तीन हजार कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत. लॉकडाऊन काळात सरकारने भरमसाट वीजबिलाची आकारणी करून लूट केली. वीजबिल माफ करावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी सरकारकडे मागणी केली. परंतु सरकारने दुर्लक्ष केले आहे. जोपर्यंत १०० युनिटपर्यंत घरगुती वीजबिल माफ केले जात नाही तोपर्यंत सरकार विरोधात आंदोलन केले जाईल, असे ते म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.