सांगली जिल्ह्यात शेतीपंपांसाठी केवळ चारच तास वीजपुरवठा

सांगली जिल्ह्यात शेतीपंपांसाठी केवळ चारच तास वीजपुरवठा
सांगली जिल्ह्यात शेतीपंपांसाठी केवळ चारच तास वीजपुरवठा

सांगली ः जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतीपंपासाठी आठ तासांऐवजी केवळ चारच तास वीजपुरवठा होत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा करा; अन्यथा तीव्र आंदोनल करू, असा इशारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली.

जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणीटंचाई आहे. तर कृष्णा आणि वारणा नद्यांतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. तसेच विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्याची पातळी  घटली आहे. पाणी देण्यासाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची पाळी लवकर येऊ लागली आहे. त्यामुळे वीज खंडित होत असल्याने पाण्याचे नियोजन करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. वारणा आणि कृष्णा नद्यांला जरी पाण्याची पातळी कमी असली तरी, अनेक शेतकऱ्यांनी नदीवर पाणीउपसा संस्था स्थापन केल्या आहेत. त्यामुळे कृष्णा आणि वारणाकाठावरील शेतकऱ्यांची पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. पाणी असूनदेखील पिके वाळू लागली आहेत. 

वास्तविक पाहता, शेती पंपासाठी आठ तास वीजपुरवठा करण्याचे महावितरण कंपनीचे धोरण आहे. परंतु शेतीसाठी पूर्वीपासूनच आठ तास वीज मिळत नाही. त्यात आता विजेची कपात केली आहे. ही कपात कशी आणि कोणत्या नियमानुसार केली आहे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. गेल्या आठवड्यापासून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो. दर पाच-दहा मिनिटाला वीज चालू बंद होत आहे. वीज का खंडित केली आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी अधिकऱ्यांना विचारला असता, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com