मुंबई : 'जगायचं कसं हा प्रश्न लोकांसमोर पडला आहे आणि तुम्ही त्यांना योगा करायला सांगताय.. स्वच्छता करायला सांगताय.. कॉंग्रेस गेले आणि भाजप आले.. देशात फरक काय पडला? गेल्या साडेतीन वर्षांत फक्त नोटांचा रंग बदलला. असलेल्या गोष्टी सुधारण्याऐवजी आम्ही काहीतरी नवीन गोष्टी आणतोय. मेट्रोमुळे मुंबईची आणखी वाट लागली आहे. आता मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही. बुलेट ट्रेन हवीच असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्येच ती फिरवावी.. यासंदर्भात जबदरस्ती करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवार (ता. ३०) सरकारला इशारा दिला.
मुंबईत एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि प्रशासनाची ढिलाई याविरोधात येत्या 5 ऑक्टोबर रोजी मनसे चर्चगेटला मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व राज ठाकरे करणार आहेत. 'या मोर्चात सर्व मुंबईकर आणि ठाणेकरांनी सहभागी व्हावे. या मोर्चांचे परिणाम होत असतात. हा गर्दीचा विषय नाही; राग व्यक्त करण्याचा आहे', असे आवाहन राज यांनी केले.
राज ठाकरे म्हणाले..
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.