शाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी घुंगुर(ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर) येथील वसुंधरा सामाजिक कौशल्य विकास संस्था कार्यरत आहे. राज्यातील ३५ तालुक्यात संस्थेचे कार्य विस्तारलेले आहे. जैवविविधतेबरोबरच सेंद्रिय शेती आणि ग्रामस्थांना रोजगाराभिमुख करण्यासाठी संस्थेच्या वतीने निरंतर प्रयत्न सुरु आहेत. घुंगुर(ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर) येथील वसुंधरा सामाजिक कौशल्य विकास संस्था गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील ३५ तालुक्यामध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून सुमारे एक हजार गावांमध्ये ग्राम विकासाच्या बरोबरीने कृषिपूरक उपक्रमांना सुरवात झाली आहे. ग्रामस्थांची जीवनशैली उंचावून त्यांना स्वयंपूर्ण करण्याचे काम सुरू आहे. जैवविविधतेबरोबरच सेंद्रिय शेती आणि ग्रामस्थांना रोजगाराभिमुख करण्यासाठी संस्थेच्या वतीने निरंतर प्रयत्न सुरु आहेत. संस्थेची स्थापना २०१५ मध्ये झाली. संस्थेचे एकूण नऊ संचालक आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, गगनबावडा या परिसरातील संचालक मंडळ आहे. मानसिंग सावरे हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सावरे हे यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय व्याख्याते आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सहकार्य संस्थेचे काम कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, लातूर, अकोला, गोंदिया परभणी आदि जिल्ह्यात विस्तारलेले आहे. राज्याच्या सर्व विभागातील जिल्ह्यात संस्था कार्यरत आहे. ग्रामविकासाचे काम करताना प्रशिक्षकांची मदत घेतली जाते. पुण्यातील यशदा संस्थेत प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक आहेत. ते राज्यातील विविध भागातील आहेत. त्यांनी एकत्र येऊन ग्रामविकासाचे कार्य विस्तारलेले आहे. विविध भागातील हे प्रशिक्षक आपापल्या जिल्ह्यात संस्थेच्या वतीने काम करतात. यामुळे अंतराची अडचण येत नाही. यशदाचे प्रशिक्षक संबंधित भागात नवे स्थानिक प्रशिक्षक तयार करून कौशल्य आधारित कामांना गती देतात. आदिवासी पाड्यामध्ये प्रभावी काम संस्था रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यामध्ये कार्यरत आहे. आदिवासी भागात नागरिकांना शिक्षणाबाबत जागृती नसल्याने तिथे अनेक प्रश्न निर्माण होतात. या भागात जावून संस्थेच्या सदस्यांनी पाड्यावरील ग्रामस्थांना विविध स्तरावर प्रशिक्षण दिले आहे. व्यसनाधिनतेतून बाहेर काढून त्यांना शेळी पालन प्रशिक्षण, रानभाजी लागवड, शेतीचे कौशल्य आणि गवंडी व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. यातून अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. जैवविविधतेवर भर
ग्रामविकासात ४२ विभागांचा सहभाग
लोकसहभागातूनच ग्रामविकास संस्थेच्या उपक्रमात यशदामधील १३ प्रशिक्षक सहभागी आहेत. त्यांच्याकडून विविध विषयांच्याबाबत मार्गदर्शन घेतले जाते. कोणत्या भागात कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे याची माहिती संबंधित प्रशिक्षकाकडून संस्थेला मिळते. यानुसार संस्थेच्या उपक्रमाचे नियोजन केले जाते. संस्थेच्या वाटचालीत यशदा संस्थेच्या प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे. हे प्रशिक्षक सामाजिक दायित्व म्हणून संस्थेला मदत करतात. विशेष करून सगळ्या घटकांना एकत्रित आणणे हे महत्त्वाचे असते. संस्थेच्या माध्यमातून विकासापासून दुर्लक्षित असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाते. प्रत्येक गावाच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर कोणता मार्ग निघेल यावर संस्थेची तांत्रिक टीम काम करते. त्यानुसारच आराखडे तयार केले जातात. संबंधित घटकांचे सहकार्य घेतले जाते. संस्था करते ग्रामविकासाचा आराखडा
शेती तंत्रज्ञान प्रसार
संपर्क- मानसिंग सावरे (अध्यक्ष), ७९७२७१७००४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.