यवतमाळ ः अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या निर्मितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५०० महिलांना रोजगार उपलब्धतेचे उद्दिष्ट असल्याची माहिती राज्याचे वने, भूकंप, पुनर्वसनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
येथील विश्रामगृहावर बांबू संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत बांबूच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखडे उपस्थित होते.
संजय राठोड म्हणाले की, बाबूंपासून अनेक वस्तूंची निर्मिती करणे शक्य आहे. घरोघरी बचत गटाला बांबूपासून रोजगार निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. याबाबत प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होऊन ५०० महिलांना रोजगार उपलब्ध होईल. तयार होणारी अगरबत्ती खरेदी करण्यासाठी आयटीसी मंगलदीप यांच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून लाखेच्या बांगड्यांची खरेदी पारधी यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. याबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबतचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.