शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाकरिता देणार प्रोत्साहन ः बच्चू कडू

शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाकरिता देणार प्रोत्साहन  ः बच्चू कडू
शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाकरिता देणार प्रोत्साहन ः बच्चू कडू

अमरावती  ः शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकातील जोखीम करून उत्पन्नाचे स्रोत बळकट करण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. बेलज येथील सेंद्रिय गूळ उद्योग केंद्राला त्यांनी भेट दिली. या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले. ना. बच्चू कडू म्हणाले, वातावरणातील बदलाचे परिणाम नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहेत. पाऊस आणि थंडीच्या दिवसात वाढ झाली आहे. पारंपरिक पिकांच्या संरचनेत त्यानुसार बदलाची गरज आहे. पारंपरिक पिकात यामुळे जोखीम वाढली असताना त्याची दखल घेत शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे स्रोत बळकट करणे आवश्‍यक आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी पूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे. गूळनिर्मिती प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांनी गूळनिर्मिती प्रकल्प उभारणीसाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com