यवतमाळ जिल्ह्यात रब्बी लागवड वाढण्याचा प्रशासनाचा अंदाज

यवतमाळ जिल्ह्यात रब्बी लागवड वाढण्याचा अंदाज
यवतमाळ जिल्ह्यात रब्बी लागवड वाढण्याचा अंदाज

यवतमाळ : जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्‍टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात समाधानकारक झालेला पाऊस, प्रकल्पात बऱ्यापैकी असलेला पाणीसाठा, विहिरीची वाढलेली पाणीपातळी, यामुळे रब्बी लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती विरोधाभासी असल्याचे चित्र आहे.

खरिप हंगामात पावसाने दिलेला खंड, त्यानंतर परतीच्या पावसावर शेतकऱ्यांची भिस्त असताना त्यानेही दिलेला फटका, यामुळे रब्बी पिके घेण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल नाही. याच कारणामुळे जिल्ह्यातील ९ तालुक्‍यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने मात्र रब्बी पेरणी वाढण्याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यानुसार नियोजनदेखील करण्यात आले आहे. यंदा कृषी विभागाने १ लाख ९८ हजार ४०४ हेक्‍टरवर रब्बी पीक लागवडीचे नियोजन केले आहे. त्यामध्ये सर्वाधिक एक लाख ५४ हजार २३४ हेक्‍टरवर हरभरा, ३८ हजार ६६६ हेक्‍टरवर गव्हाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. याशिवाय दोन हजार हेक्‍टरवर ज्वारी, ४३७ हेक्‍टरवर मका, तीन हजार हेक्‍टरवर इतर पिकांचा समावेश आहे. जलयुक्‍त शिवार तसेच शेततळ्याची या वर्षी चांगली कामे झाल्याने त्याचा फायदा पिकांना होण्याची शक्‍यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे. परंतु जिल्ह्याच्या ९ तालुक्‍यांतील दुष्काळी स्थितीचे चित्र वेगळेच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com