इथेनॉल प्रकल्प ‘बीओटी’ तत्त्वावर, मुंबईत आज बैठक

इथेनॉल प्रकल्प ‘बीओटी’ तत्त्वावर, मुंबईत आज बैठक
इथेनॉल प्रकल्प ‘बीओटी’ तत्त्वावर, मुंबईत आज बैठक

सोलापूर : उसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनविण्याचा विचार सुरू आहे. त्यासंदर्भात २७ डिसेंबरला मुंबईत बैठक होणार आहे. इथेनॉल प्रकल्प पेट्रोलियम कंपन्यांना ‘बीओटी’ तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव आम्ही देण्याचा विचार करत असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.  "सकाळ''च्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्री देशमुख यांनी "सकाळ'' कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी झालेल्या चर्चेत त्यांनी ही माहिती दिली. सहकारमंत्री देशमुख म्हणाले, की इथेनॉलसंदर्भात होणाऱ्या या बैठकीसाठी सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, डिस्टिलरी कंपन्या, साखर संघाचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. सध्या साखर कारखाने तोट्यात चालले आहेत. यावर मात करण्यासाठी कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे लक्ष द्यायला हवे. देशातील पेट्रोलियम कंपन्यांना ‘बीओटी’ तत्त्वावर डिस्टिलरी प्रकल्पांत गुंतवणूक करण्यासंदर्भात केंद्राला साकडे घातले जाणार आहे. या कंपन्यांना प्रकल्प उभारून साखर कारखान्यांनाही मदतीचा हात द्यायचा आहे.  देशात येणाऱ्या साखरेवर जवळपास ४० टक्के आयात कर लावला जातो. त्यामुळे देशातील साखरेला बऱ्यापैकी दर असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी निधीची गरज असेल, तर माझ्याकडे मागणी करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्ह्याच्या विकासकामासाठी निधी आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com