पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात ठिय्या

पाऊस, पाणी आले, तरी आम्ही हटणार नाही. पूर आला तर वाहून जाऊ, मात्र योग्य पुनर्वसनासाठीचा लढा कायम ठेवू . - राजन लांजेवार, टेकेपार शेतीचे सारेच काम थांबले आहे. कापूस वेचणी, हिरवी मिरची, भाजीपाला तोडणी आंदोलनामुळे खोळंबली आहे. सरकारने अंत पाहू नये. - सुधाकर तितरमारे, टेकेपार
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात ठिय्या
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात ठिय्या

वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरने भरलेल्या आम नदीपात्रात ठिय्या दिला आहे. त्यांचे जल व अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सोमवारी (ता. १७) पाचव्या दिवशी आंदोलकांनी भरपावसातही हे आंदोलन सुरू ठेवले. अजूनही योग्य तोडगा न निघाल्याने शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. 

परिसरात रिपरिप पावसाला सुरवात झाली आहे. बोचरा वारा व हवेतील गारवा कमालीचा वाढला आहे. आंदोलनस्थळी चिखल होता.  सोमवारी आंदोलकांचे एक शिष्टमंडळ पालकमंत्री, पुनर्वसन अधिकाऱ्याच्या बोलावण्यावरून नागपूर येथे बैठकीला गेले. मांढळ बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

ते म्हणाले, शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. शेतकामाच्या हंगामात पिकांना जगविणे सोडून आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणे ही खेदाची बाब आहे. प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचा हा कळस आहे. राजकारणी आंदोलनस्थी भेट देत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com