सोलापुरातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

सोलापुरातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
सोलापुरातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

सोलापूर  सोलापूर जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षाही खूपच कमी झाल्याने रब्बी हंगामातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ११५४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  सोलापूर जिल्हा रब्बीचा म्हणून ओळखला जातो. पण यंदा केवळ 38 टक्के इतकाच पाऊस झाल्याने हा हंगाम पुरता वाया गेला आहे. रब्बी ज्वारीसह अन्य सर्व पिके हातची गेली आहेत. आता शिवारात आहे ती पिकेही केवळ पाण्याअभवी जळून चालली आहेत. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत अधिक भीषण दुष्काळाची स्थिती यंदा उदभवली आहे. सुधारित पैसेवारी १५ जानेवारी तर अंतिम पैसेवारी ही १५ मार्चपर्यंत तयार करण्यात येते. खरीप हंगामातही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यंदा जिल्ह्यात रब्बीच्या फक्त २५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील नजर अंदाज पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी असल्याची माहिती सादर करण्यात आली आहे. दुष्काळ जाहीर होण्यासाठी पैसेवारीसोबतच आता पीक कापणी प्रयोग, सॅटेलाइटद्वारे पाहणी याचाही विचार करण्यात येत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पेरणीच्या क्षेत्रातही घट झाल्याने नजर अंदाज पैसेवारी कमी आहे. सुधारित पैसेवारी व अंतिम पैसेवारीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे; पण ती काय असेल, ते आता पुढच्या टप्प्यात समजणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com