‘कांदा विक्रीसाठी घाई करू नका’

‘कांदा विक्रीसाठी घाई करू नका’
‘कांदा विक्रीसाठी घाई करू नका’

पुणे : एमईपी लागू केल्यानंतरही रिटेलमध्ये भाव कमी होत नव्हते, त्याचा कांदा निर्यात बंदी परिणाम आहे. निर्यात मूल्य वाढवल्यानंतरही श्रीलंका व आखाती देशात अगदी कमी प्रमाणात जाणारा माल बंद होईल. कांदा उत्पादकांनी विक्रीसाठी घाई करू नये. तत्काळ सोमवारी (ता. ३०) मार्केटमध्ये गर्दी करू नये. सध्या सुरू असलेली निर्यात अत्यंत तोकडी आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे उद्यापुरते भाव पाडायला आयते निमित्त मिळेल, अशी गर्दी मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी करू नये. कांदा आयात, एमईपी आदी निर्णयांनंतरही कांदा दरात वाढ झाली, हे शेतकऱ्यांनी विसरू नये. दोन दिवसांनंतर मार्केट पुन्हा पूर्ववत वरच्या पातळीवर दिसेल, त्यामुळे वाट पाहावी.  खरे तर सध्या निर्यातमालाचा आकार (Volume) अत्यंत तोकडा आहे. निर्यात मूल्य वाढल्यानंतर तर देशाच्या दैनंदिन गरजेच्या तुलनेत एक-दीड टक्केही निर्यात होत नसेल. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत कांद्याचे सरासरी रेट्स ३५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. म्हणजेच शेतकऱ्याला ३५ रु. प्रतिकिलो मिळताहेत, तर मोठ्या शहरांत हाच माल ग्राहकाला ६० ते ८० रु. प्रतिकिलोने विकला जात आहे. रिटेलमधील रेट अनावश्यकरीत्या वाढत असतील, तर तिथे राज्यांनी काम करणे अपेक्षित आहे.  यंदा डिसेंबरच्या मध्यापर्यंत कांद्याचा तुटवडा दिसतो आहे. आधीच घटलेल्या खरीप लागणींचा कांदा मागील आठवड्यातील पावसामुळे खराब झाल्याचे वृत्त आहे. नुकसानीची तीव्रता किती याची मोजमाप करणारी यंत्रणा नाही. पण दहा-पंधरा दिवसांत जुना कांदा संपेल, तेव्हा देशात पुरवठ्याची मोठी पोकळी तयार होईल, असे दिसते. त्याने रिटेल बाजार कुठल्या टोकाला जाईल, हे माहिती नाही. दरम्यान, ज्यांचा माल खराब होत असेल, त्यांना कांदा विकण्यास अडचण नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com