अर्थसंकल्प हा सगळा भुलभूलैय्याचा कार्यक्रम आहे : राजू शेट्टी

अर्थसंकल्प हा सगळा भुलभूलैय्याचा कार्यक्रम आहे : राजू शेट्टी
अर्थसंकल्प हा सगळा भुलभूलैय्याचा कार्यक्रम आहे : राजू शेट्टी

पुणे : ‘‘आज मांडलेला अर्थसंकल्प हा अंतरिम असल्याने यामध्ये काही दम नाही, सगळा भुलभूलैय्याचा कार्यक्रम आहे. आणखी दीड महिन्यांनी नवीन सरकार, नवा अर्थमंत्री येणार त्यामुळे या अर्थसंकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी होईल की नाही याबाबत शंका आहे,'' अशी प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. खा. शेट्टी म्हणाले ',''अर्थसंकल्प पुढील १० वर्ष डोळ्यासमोर ठेवून मांडला असल्याचे प्रभारी अर्थमंत्र्यांनी सांगितले, तर मग गेली ४ वर्ष ८ महिने सरकारने झोपा काढल्या होत्या का? महागाई कमी केल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २२ शेतमालाच्या हमीभावापेक्षा १ हजार ते दीड हजार रुपये कमी दराने शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केला आहे. यामध्येच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना. आता ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या तोंडावर फेकण्या सारखा हीन प्रकार सरकार करत आहे.''  शेती अवजारे आणि निविष्ठावर जीएसटी लावण्यात आलेला आहे. ही जीएसटी ६ ते १८ आणि आयात निविष्ठांवर २८ टक्क्यांपर्यंत आहे. जीएसटीचा उद्योजकांना परतावा मिळतो. मात्र शेतकऱ्यांना कोणताही परतावा मिळत नाही. यामुळे शेतकरीच सर्वाधिक जीएसटी भरत असून, शेतकऱ्यांना कोणताही दिलासा करप्रणालीमध्ये मिळत नाही. तसेच ग्रामीण भागात सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या साखर, वस्त्रोद्योग आणि शेतमाल प्रक्रियांसाठी कोणतीही तरतूद केलेली नसल्याने निराशाजनक अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांची निराशा सरकारला निवडणुकीत भोगावी लागणार आहे,’’ असे खा. राजू शेट्टी शेवटी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com