सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने रानोमाळी मांडला खेळ

सोलापूर : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. रानोमाळी अतिवृष्टीने खेळ मांडला आहे.
In farm game in Solapur district due to heavy rains
In farm game in Solapur district due to heavy rains

सोलापूर : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. रानोमाळी अतिवृष्टीने खेळ मांडला आहे.

या दोन दिवसांत जिल्ह्यातील १८३ गावांतील २८ हजार ३३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषि विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्यानं कांदा, डाळिंब, केळी, ऊस, सोयाबीन, तूर या पिकांसह टोमॅटो, मिरची, फ्लॅावर, कोबी यासारख्या भाजीपाला आणि फळभाज्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात शनिवार (ता.१०) पासून पाऊस होतो आहे. मंगळवारी (ता.१३) मात्र रात्री साडेआठ वाजता सुरु झालेला पाऊस बुधवारी (ता.१४) दुपारपर्यंत कोसळतच होता. सायंकाळी त्याने काहीशी विश्रांती घेतली. पण रात्री पुन्हा सुरुवात केली. गुरुवारी (ता.१५) दिवसभर पुन्हा कधी पाऊस कधी, ढगाळ वातावरण राहिले. सलग पाच-सहा दिवसांपासून पाऊस होत असल्याने शेतीचे नुकसान झाले. अनेक भागात अतिवृष्टी झाली. 

शेतीच्या नुकसानीत सांगोला, पंढरपूर, मोहोळ, माढा, बार्शी या तालुक्यातील डाळिंब, केळी, ऊस या पिकांमध्ये पाणी साठले. तर, उत्तर सोलापूर, बार्शी, माढा, मोहोळ तालुक्यात कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. या आधीच महिनाभरापूर्वीही या पैकी अनेक भागात पिकांची पावसामुळे दाणादाण झाली होती.

आता पुन्हा एकदा पावसाच्या नुकसानीची झळ बसली आहे. कृषि विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यातील १८३ गावातील ४५ हजार शेतकऱ्यांच्या २८ हजार ३३५ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे.

बार्शी तालुक्याला सर्वाधिक फटका

या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बार्शी तालुक्याला बसला. त्यात बार्शीतील १३७ गावे, त्यानंतर दक्षिण सोलापुरातील १९, अक्कलकोट तालुक्यातील नऊ, पंढरपुरातील सात आणि सांगोल्यातील ११ गावांना त्याची झळ बसली. या पावसामुळे बार्शीतील १३० आणि दक्षिण सोलापुरातील दोन कुटुंबांचे स्थंलातर करण्यात आले आहे. त्याशिवाय ८० पाझर तलाव आणि बंधाऱ्यांची पडझड झाली आहे. 

परिसरात अतिवृष्टी झाली आहे. काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. कांद्याचेही नुकसान झाले आहे. शासनाने सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावे. मात्र, मोजक्याच लोकांचे पंचनामे केले आहेत. त्वरित कार्यवाही होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. - सुनिल गाढवे, प्रगतीशील शेतकरी, पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर

        ठळक मुद्दे

  •     बार्शी तालुक्यात अति नुकसान
  •     १३२ कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
  •     ८० पाझर तलाव आणि बंधाऱ्यांची           पडझड
  •     प्रमुख आठ ते नऊ महामार्ग बंद  
  •     बार्शी, मोहोळमधून वाहणारी                भोगावती, नागझरी नदीला पूर
  •     कुरनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com