राजस्थानमधील शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत कर्जमाफी

राजस्थान शेतकरी
राजस्थान शेतकरी

जयपूर, राजस्थान ः सलग तेरा दिवस चाललेल्या शेतकरी अांदोलनाची दखल घेत राजस्थान सरकारने शेतकऱ्यांचे ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची तयारी दाखविली अाहे. यामुळे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र पाठोपाठ राजस्थान हे शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करणारे तिसरे भाजपशासित सरकार ठरले अाहे. 

राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या अाश्वासनानंतर १ सप्टेंबरपासून राजस्थानमधील १४ जिल्ह्यांत सुरू असलेले अांदोलन किसान सभेने मागे घेतले अाहे.  शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक नुकसानाची भरपाई, स्वामिनाथन अायोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी यांसह एकूण ११ मागण्यांसाठी राजस्थानमधील सिकर, बिकानेर जिल्ह्यांसह अन्य भागांत शेतकऱ्यांनी १ सप्टेंबरपासून अांदोलन सुरू केले होते.

शेतकऱ्यांनी शहरात होणारा भाजीपाला अाणि दूधपुरवठा थांबविला होता. ठिकठिकाणी चक्काजाम करून वाहतूक रोखली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळित होऊन भाजीपाला, दुधाचे दर वाढले होते. शेतकऱ्यांच्या या अांदोलनापुढे राजस्थान सरकार अखेर झुकले. मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या सरकारने शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून कर्जमाफी देण्याचे अाश्वासन दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर राजस्थान सरकारवर २० हजार कोटींचा अातिरिक्त भार पडणार अाहे.  कर्जमाफीसाठी समिती स्थापन ः कृषिमंत्री सैनी राजस्थानचे कृषिमंत्री प्रभूलाल सैनी यांनी म्हटले अाहे, की शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी अाम्ही उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब अादी राज्यांतील कर्जमाफी प्रक्रियेचा अभ्यास करणार अाहोत. यासाठी एक समिती स्थापन केली अाहे. ही समिती एक महिन्याच्या अात अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com