कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गार
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

नवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल, स्वामिनाथन आयोग शिफारसी आदी मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत शनिवारी (ता. २१) आंदोलन केले. किसान घाटाकडे मोर्चाने निघालेल्या शेतकऱ्यांना दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवरील गाझीपूर येथे अडविण्यात आले. याच ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.  भारतीय किसान संघटनेच्या नेतृत्वाखाली पश्‍चिम उत्तर प्रदेशातील शेकडो शेतकऱ्यांच्या ११ सप्टेंबरपासून सरहनपूर ते दिल्लीतील किसान घाट अशा पायी मोर्चाचे आयोजन केले होते. शनिवारी हा मोर्चा गाझीपूर येथे अडविण्यात आला. शेतकऱ्यांच्या ११ जणांचे शिष्टमंडळ केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे चर्चेसाठी गेले. सायंकाळी सहापर्यंत याबाबत निर्णय झाला नाही. शेतकऱ्यांच्या मोर्चा आणि ठिय्या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबा होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती.  शेतकऱ्यांच्या त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी दिल्ली येण्यापासून का रोखले जात आहे? भाजप सरकार निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या कल्याणाविषयी सातत्याने बोलत होते. मात्र, जेव्हा शेतकरी थकीत ऊस बिल, कर्जमाफी, वीजबिलात कपात आदी मागण्या करीत आहेत, तर त्यांना बोलण्यापासून का रोखले जात आहे? - प्रियांका गांधी, सचिव, काँग्रेस देशातील शेतकरी अत्यंत आर्थिक अडचणीत आहे. शेती उत्पन्न खूप कमी झाले आहे. गरिबी रेषेखाली शेतकरी जीवन जगत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करणे आवश्‍यक आहे. जर सरकार उद्योग शेत्राला अडचणीतून सावरण्यासाठी मदत करते, तर शेतकऱ्यांकरिता का नाही? - सुधींद्र भदोरिया, नेते, बहुजन समाज पार्टी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com