पोटाला चिमटा बसल्यावरच शेतकरी रस्त्यावर येतो ः अजित पवार

‘‘शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे, असे केंद्र सरकार म्हणत असेल, तर तो त्याविरोधात रस्त्यावर उतरला नसता,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
पोटाला चिमटा बसल्यावरच शेतकरी रस्त्यावर येतो ः अजित पवार
पोटाला चिमटा बसल्यावरच शेतकरी रस्त्यावर येतो ः अजित पवार

मुंबई : ‘‘शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे, असे केंद्र सरकार म्हणत असेल, तर तो त्याविरोधात रस्त्यावर उतरला नसता,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. जनता दरबारसाठी पवार राष्ट्रवादी भवनमध्ये आले असता माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. शरद पवार कालच राष्ट्रपतींना भेटले आहेत. त्या वेळी त्यांनी विधेयकावर काय केले पाहिजे हे सविस्तर मांडले आहे. केंद्रातील वरिष्ठ मंत्री शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत; परंतु तोडगा अजून निघत नाही. केंद्र सरकार विधेयकात काही प्रमाणात बदल करणार असल्याचे सांगत आहे; परंतु स्पष्ट काही सांगत नाही, असेही अजित पवार म्हणाले.

लोकशाहीत हे चालत नाही! एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची मागणी येते त्या वेळी केंद्राने हटवादाची भूमिका बाजूला ठेवून सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा हे लोकशाहीत चालत नाही, याची नोंद सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com