आमदारांविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने 

हरियाना सरकारविरोधात दाखल अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या आमदारांविरोधात तेथील शेतकऱ्यांनी आता धरणे आंदोलन सुरू केले आहे.
प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

नवी दिल्ली : हरियाना सरकारविरोधात दाखल अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या आमदारांविरोधात तेथील शेतकऱ्यांनी आता धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

हरियानातील भाजप सरकार विरोधात काँग्रेसने अविश्‍वास ठराव बुधवारी (ता. १०) दाखल केला होता. दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या काही नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव वाढविण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांना ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र ५५ विरुद्ध ३२ अशा फरकाने स्पष्ट बहुमतात हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटली. परिणामी, ज्या आमदारांनी हरियानातील मनोहरलाल खट्टर सरकारला वाचविले, त्यांच्या घरांसमोर धरणे आंदोलन सुरू केले. 

भाजपचे आमदार असीम गोयल यांच्या अंबाला येथील निवासस्थानी निदर्शने केली. आमदार गोयल यांना शेतकरीविरोधी म्हणून शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. ९० सदस्य संख्या असलेल्या हरियाना विधानसभेत सध्या ८८ सदस्य असून बहुमतासाठी ४५ मतांची गरज असते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com