आर्वी तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचे आंदोलन

टाळेबंदीत वाढ केल्याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात फळांची रास ओतून संताप व्यक्त केला. ८ ते १३ मेपर्यंत लावण्यात आलेल्या कडक निर्बंधात १८ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यावर त्याचे सर्वत्र पडसाद उमटल्याचे दिसत आहे.
Farmers' agitation at Arvi tehsil office
Farmers' agitation at Arvi tehsil office

वर्धा : टाळेबंदीत वाढ केल्याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात फळांची रास ओतून संताप व्यक्त केला. ८ ते १३ मेपर्यंत लावण्यात आलेल्या कडक निर्बंधात १८ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यावर त्याचे सर्वत्र पडसाद उमटल्याचे दिसत आहे.

आर्वी तालुका प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात फळे आणून टाकली. प्रशासनातर्फे कसलेही नियोजन नसून वारंवार लावण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील फळे, भाजीपाला शेतातच सडत आहे. शेतकऱ्यांना न सहन होणारा आर्थिक फटका बसत असल्याने प्रचंड संताप असल्याचे बाळा जगताप यांनी सांगितले. त्यामुळे बुधवारी (ता. १२) शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात विविध फळांचा ढीगच रचला. या संतप्त भावनेची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यात रोज सकाळी ११ वाजेपर्यंत शेतकऱ्यांना फळ, भाजीपाला विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय झाला.

आर्वी येथील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला, तरी जिल्ह्यातील इतर भागांत मात्र प्रशासनाकडून भाजीपाला आणि फळे विकण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतातच सडत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com