भरपाईसाठी शेतकरी धडकले तहसीलवर

भरपाईसाठी शेतकरी धडकले तहसीलवर
भरपाईसाठी शेतकरी धडकले तहसीलवर

यवतमाळ ः जिल्ह्याच्या १६ तालुक्‍यांपैकी केवळ सहा मंडळांतच अतिवृष्टी दाखविण्यात आली. उर्वरित तालुके त्यामुळे मदतीपासून वंचित राहणार असल्याने या विरोधात महागाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी गुुरुवारी (ता. ७) तहसील कार्यालयावर धडक दिली. या वेळी भरपाई संदर्भाने सर्वांचाच विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी भरपाईकरिता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात दहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्यात सर्वदूर सर्वेक्षण आणि पंचनामेदेखील सुरू आहेत. असे असताना कायद्यावर बोट ठेवत यवतमाळ जिल्ह्यातील केवळ सहा मंडळांमध्येच अतिवृष्टी दाखवित उर्वरित तब्बल २१० मंडळांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा डाव रचण्यात आला आहे. 

मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या गुंज मंडळालादेखील अतिवृष्टीतून वगळण्यात आले. या उलट महागाव तालुक्‍यातील दोन मंडळेच घेण्यात आली. पावसामुळे पीक नुकसान झाल्याने याच तालुक्‍याच्या माळकिन्ही येथील गजानन शिरडकर यांनी आत्महत्या केली होती. पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या चिंतेने त्यांनी आत्मघात केला होता. असे प्रकार यापुढे वाढीस लागतील, त्याची दखल घेत १६ तालुक्‍यांत सरसकट मदत मिळावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना या संदर्भाने निवेदन पाठविण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य परसराम डवरे, खरेदी विक्री संघाचे संचालक मधुकर राठोड, सरपंच भारत मनवर, दिगंबर देवकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com