अकोल्यात शेतकरी करणार दोन लाख क्विंटल सोयाबीन बियाणे तयार

जिल्ह्यात सुमारे १७ हजारांवर शेतकरी बियाणे तयार करणार असून किमान दोन लाख क्विंटल बियाणे निर्माण होईल, अशी अपेक्षा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदयकुमार नलवडे यांनी बोलताना व्यक्त केली.
Farmers in Akola will produce two lakh quintals of soybean seeds
Farmers in Akola will produce two lakh quintals of soybean seeds

अकोला ः गेल्या काही हंगामापासून सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेविषयी अनेक तक्रारी वाढत आहेत. हे लक्षात घेता शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी लागणारे दर्जेदार बियाणे घरीच तयार करण्यासाठी कृषी विभागाने मोहीम राबवली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात सुमारे १७ हजारांवर शेतकरी बियाणे तयार करणार असून किमान दोन लाख क्विंटल बियाणे निर्माण होईल, अशी अपेक्षा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदयकुमार नलवडे यांनी बोलताना व्यक्त केली.

सध्या सोयाबीन काढणी सुरू असून यातील चांगल्या दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांनी वेगळे ठेवून त्याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तालुका कृषी अधिकाऱ्यांना नुकतेच पत्र देत सोयाबीन कापणी पश्चात व बियाणे साठवणुकीबाबत शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, याविषयी माहिती दिली आहे. हंगाम सुरू झाल्यापासून या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.

प्रक्षेत्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुमारे १७ हजारांवर शेतकऱ्यांना यादृष्टीने मार्गदर्शन केले.या शेतकऱ्यांच्या माध्यमातून दोन लाख १२ हजार क्विंटल बियाणे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परतीचा पाऊस सोयाबीन काढणीच्या वेळेसच आल्याने नुकसान झाले आहे. परिणामी हे घरचे बियाणे निर्माण करण्यात काहींना अडचणीही तयार झाल्या. त्यामुळे बियाणे तयार करण्याच्या सूचना केल्या आहे.

अशी घ्या काळजी सोयाबीन काढणीनंतर ते वाळवावे. वाळवताना मोठा ढीग न ठेवता पातळ थर करावा. शक्यतो सावलीत वाळवावे. जेणे करून बियाण्यामध्ये असलेल्या आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही व बियाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही. मळणी करताना बियाण्यामध्ये १३ ते १४ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असू नये. सोयाबीन मळणी करताना यंत्राचा वेग कमी ठेवावा. त्यामुळे बियाण्यास इजा पोचणार नाही. मळणी केल्यानंतर सरळ पोत्यात न भरता दोन ते तीन दिवस ताडपत्रीवर वाळवावे. त्यानंतर बियाणे चाळणीद्वारे गाळणी करून घ्यावे. बियाण्याच्या पोत्यांची थप्पी सात पोत्यांपेक्षा उंच जाणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com