खानदेशात कांदा अनुदानापासून शेतकरी वंचित

खानदेशात कांदा अनुदानापासून शेतकरी वंचित
खानदेशात कांदा अनुदानापासून शेतकरी वंचित

जळगाव : खानदेशात कांदा अनुदानापासून अजूनही शेतकरी वंचित आहेत. मागील महिनाभरापासून अनुदानाचे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. अशातच विक्रीसंबंधीच्या तारखेत दोन वेळेस बदल झाल्याने अर्ज घेण्यासाठी बाजार समिती व सहायक निबंधक कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. 

सुमारे १२ हजार अर्ज या अनुदानसाठी मागील दोन महिन्यांत दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्यासंबंधीची मुदतवाढ मिळाली, परंतु ज्यांनी मागील दोन महिन्यांत अर्ज सादर केले, त्यांना अनुदान अजूनही मिळाले नाही. शेतकरी दोन, तीन दिवसाआड बॅंक व सहायक निबंधक कार्यालयात चकरा मारत आहेत.

एकाही अर्जदारास हे अनुदान प्राप्त झाले नाही. २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे अनुदान कमाल २०० क्विंटलसाठी एका शेतकऱ्याला मिळणार आहे. काही शेतकऱ्यांनी दोन ते अडीच एकर लागवड केली होती. त्यांना ३०० क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळाले. उर्वरित १०० क्विंटल कांद्यासंबंधी अनुदान त्यांना मिळणार नसल्याने त्यांची नाराजी आहे. 

मुदतवाढ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी बाजार समितीत वाढत आहे. परंतु त्यांना अर्ज मिळत नाहीत. बाजार समिती प्रशासन व सहायक निबंधक कार्यालयातून या अर्जांच्या झेरॉक्‍स काढून घेण्याची सूचना शेतकऱ्यांना केली जाते. यासाठी शेतकरी वणवण फिरतात. खानदेशात सर्वाधिक अर्जदार धुळे जिल्ह्यात आहेत. यापाठोपाठ जळगाव व नंदुरबार तालुक्‍यांतून या अनुदानासाठी अर्ज दाखल झाले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com