सोलापूर ः बार्शी तालुक्यातील खामगाव, येळंब, बावी (आ) या गावातील शेतकऱ्यांच्या वीजतारा तुटणे, डीपीची दुरुस्ती यासह विविध मागण्यासाठी महावितरणसमोर शेतकरी संघटनेच्या वतीने नुकतेच आंदोलन करण्यात आले. त्यावर आठ दिवसात दुरुस्तीची कामे करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.
संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वखाली हे आंदोलन झाले. खामगाव बार्शी रस्त्यावर मस्के, वैद्य, पेजगुडे वस्तीवरील पूर्ण एलटी सिंगल फेजलाईन चालू करा, खामगाव येथील खंदारे डीपीच्या पोलवरील तारा जीर्ण आणि खराब झाल्या आहेत. त्या बदलून मिळाव्यात, आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.
त्यावर बार्शीचे उपकार्यकारी अभियंता अरविंद भाग्यवंत यांनी येत्या आठ दिवसांत या सर्व मागण्यांची पूर्तता करु, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.
या आंदोलनात शरद भालेकर, सचिन आगलावे, मुकूंद पेजगुडे, रामराव काटे, प्रविण उघडे, रूषी सुरवसे, रमेश डोके, विशाल लोखंडे, चेतन लोखंडे, रामहरी लोखंडे, अरूण मुळे, अतुल मस्के आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.