संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

ढगाळ हवामानामुळे साताऱ्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

सातारा  ः अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाचे संकट बाहेर पडत असतानाच शुक्रवारी (ता. १८) सकाळपासून ढगाळ हवामान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे पिकांच्या काढणीस वेग आला असून शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

खरीप हंगामात माण, खटाव, फलटण तालुक्यांत टंचाईमुळे काही प्रमाणात क्षेत्र नापेर राहिले होते. हा अपवाद वगळता जिल्ह्यात बहुतांशी तालुक्यात ९० टक्के पेरणी झाली होती. पिकांची वाढ तसेच आंतरमशागतीच्या कामावेळी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला होता. तसेच आंतरमशागतीची कामे न करता आल्याने शेतात मोठ्या प्रमाणात तण आले होते. पिके भरणीनंतर काढणीच्या वेळेपर्यंत पावसामुळे पिके झडली आहेत. अशा कारणांमुळे एकूण उत्पादन घट होणार आहे. सध्या सोयाबीन, भुईमूगासह अन्य पिकांच्या काढणी, मळणीची कामे सुरू झाली असून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शुक्रवारी सकाळपासून ढगाळ हवामान होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पाऊस कधीही येऊ शकतो त्यामुळे काढणी किंवा मळणी झालेली पिके सुरक्षित ठिकाणी नेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. काढलेली पिके झाकून ठेवली जात आहेत. शेतात अजूनही ओल असल्याने मळणीचे कामही व्यवस्थित होत नाही. शुक्रवारी सकाळी खटाव तालुक्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. तसेच इतर भागांत ढगाळ हवामानामुळे काही शेतकऱ्यांनी कामे बंद ठेवली आहे. पाऊस जास्त झाल्यास खरिपातील पिकांचे नुकसान वाढणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ढगाळ हवामानाचा फटका निवडणूक प्रचारास बसला आहे. दहीवडी येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची शुक्रवारी होणारी सभा रद्द करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com