सांगलीत खरेदी मर्यादेमुळे तूर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा बहिष्कार

माहिती घेण्यासाठी खरेदी केंद्रात फोन केला असता अद्यापही मर्यादा वाढवली नसल्याचे त्यांनी सांगितले. अजून किती दिवस लागणार याचीही माहिती नाही, मर्यादा वाढवून आली की तुम्हाला फोनवरून सांगितले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. — सुरेश रजपूत, उटगी, ता. जत, जि. सांगली
tur procurement
tur procurement

सांगली ः राज्य शासनाने हमीभावाने तूर खेरदीसाठी हेक्टरी २५७ किलोची मर्यादा घातली आहे. ही अट अन्यायकारक असल्याचा आरोप करत जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी मर्यादा वाढवत नाही तोपर्यंत तूर खरेदी केंद्रावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रीसाठी आणलेली पोती येथील विष्णूअण्णा खरेदी-विक्रीच्या गोदामात टाकून शेतकऱ्यांनी घर गाठले आहे. आता शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.  जिल्ह्यातील ५२० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्यात जत तालुक्यातील सुमारे ३५ शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठीचा संदेश दिला होता. त्यानुसार गेल्या पाच दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन येथील तूर खरेदी केंद्रात ४०० पोती तूर विक्रीसाठी आणली होती. परंतू तूर खरेदीची मर्यादा हेक्टरी २५७ किलो असल्याने शेतकरी संतप्त झाले आणि तूर विक्री न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. खेरदी मर्यादा वाढवित नाही तोपर्यंत विक्री न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. मर्यादा वाढवली जाईल या आशेने पाच दिवस शेतकरी बाजार समितीच्या आवारात मुक्काम ठोकून होते. ‘खरेदीची मर्यादा वाढविण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे,’ असे बाजार समिती प्रशासन आणि खरेदी केंद्राचे अधिकारी शेतकऱ्यांना सांगत होते. परंतू या संदर्भात कोणत्याही हालचाली न झाल्याने शेतकरी आखणीच संतप्त झाले.   दरम्यान, ज्या गाडीतून माल आणला होता त्याचे दिवसागणिक भाडे वाढत होते. त्यामुळे तूर ठेवण्यासाठी बाजार समिती प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी विनवण्या केल्या. परंतू बाजार समितीने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडेच तूर ठेवण्याची विनंती केली. अधिकाऱ्यांनी माल ठेवण्यास परवानगी दिली, मात्र जबाबदारी घेतली नाही. ‘तुमच्या जबाबदारीवर माल ठेवा, आम्ही कोणतीही जबाबदारी घेणार नाही,’ असे सांगून अधिकाऱ्यांनी हात वर केले.  वाढते गाडी भाडे देण्यापेक्षा खरेदी केंद्रातच माल ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. २०० क्विंटल तूर केंद्रातच ठेवून शेतकऱ्यांनी शेवटी गावाची वाट धरली.  बाजार समितीने  जबाबदारी टाळली शेतकऱ्यांनी ४०० पोती विक्रीस आणली होती. परंतू मर्यादेचा तिढा सुटला नाही. त्यामुळे बाजार समितीने शेतकऱ्यांचा शेतमाल गोदामात सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांनी विनवण्या करूनही बाजार समितीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com