नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ कोटींचा पीकविमा

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात झालेल्या नुकसानीपोटी पीकविमा योजनेतून ८ कोटी ४९ लाख ५९ हजार ६६७ रुपयांची भरपाई मिळणार आहे. २ लाख ५१ हजार ६७६ हेक्टर क्षेत्रावरील ४ लाख ६४ हजार ५४७ शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ कोटींचा पीकविमा Farmers in the city will get Crop insurance of Rs
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ कोटींचा पीकविमा Farmers in the city will get Crop insurance of Rs

नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात झालेल्या नुकसानीपोटी पीकविमा योजनेतून ८ कोटी ४९ लाख ५९ हजार ६६७ रुपयांची भरपाई मिळणार आहे. २ लाख ५१ हजार ६७६ हेक्टर क्षेत्रावरील ४ लाख ६४ हजार ५४७ शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. गेल्या वर्षी केवळ शेतकऱ्यांनी विम्यापोटी भरलेल्या रकमेच्या अर्धीच रक्कम शेतकऱ्यांना विमा भरपाई म्हणून दिली जात असल्याचे दिसून येत आहे. सरकारकडून मिळालेला हप्ता वेगळाच आहे.  नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी २०२०-२१ मधील खरीप हंगामात सुरुवातीला वादळ व त्यानंतर सातत्याने पाऊस यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होत विमा भरला. नगर जिल्ह्यात गेल्यावर्षी खरिपात २ लाख ५९ हजार ४४८ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवून ४ लाख ६६ हजार २४५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यंदाचा जुलै संपला तरी नगर गतवर्षीचा खरिपाचा विमा मिळत नसल्याने सातत्याने ओरड केली जात होती. शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनीही या बाबत सतत पाठपुरावा केला.  आता कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार खरिपाच्या विम्याची ८ कोटी ४९ लाख ५९ हजार ६६७ रुपये नुकसान भरपाई जाहीर झाली आहे. त्यात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५ कोटी ३६ लाख १ हजार ७७३ व पीक उत्पादन कमी निघाल्याबाबत ३ कोटी ७ लाख ११ हजार ४०६ रुपये आहेत. गेल्या वर्षी मोठे नुकसान झालेले असल्याने भरीव विमा मिळेल, अशी आशा होती. मात्र ती फोल ठरली आहे. विमा कंपन्यांनी अत्यंत तोकडी रक्कम दिली आहे.  नफेखोरी थांबविणार कधी? नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी खरिपात ४ लाख ६६ हजार २४५ शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ४४८ हेक्टर क्षेत्राचा विमा भरला होता. शेतकऱ्यांचा हप्ता म्हणून १७ कोटी ६५ लाख रुपये भरले गेले. शिवाय सरकारचा हिस्सा मिळून मोठी रक्कम विमा कंपनीला मिळाली. त्यातून ७४५ कोटी रुपये शेतकऱ्यांचे संरक्षित झाल्याचे सांगितले गेले. यंदा प्रत्यक्षात केवळ ८ कोटी ४९ लाख ५९ हजार ६६७ रुपये विमा भरपाई मिळत असल्याचे जाहीर केले आहे. विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या व हेक्टर क्षेत्र भरपाईच्या तुलनेत ठेवले असले तरी भरपाई रकमेची टक्केवारी कमी केल्याने रक्कम घटली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने मोठे नुकसान झाले असताना टक्केवारी कमी करून विमा कंपन्यांनी नफेखोरी केली आहे.

तालुकानिहाय मिळणारी रक्कम  अकोले ः ५७,९७,११५, जामखेड ः १,६८,२२९, कर्जत ः २७,४९,७९२, कोपरगाव ः १,६७,७०,०३८, नगर ः ८,४५,११६, नेवासा ः १,२७,१९,०८८, पारनेर ः ९,८७,९३०, पाथर्डी ः ९,०१,४८२, राहाता ः ९२,२२,१५७, राहुरी ः ८४,२२,३८५, संगमनेर ः ९, ८२,९८१, शेवगाव ः २२,२९,०३६, श्रीगोंदा ः २,०५,१३,४०६ श्रीरामपूर ः ७८,६८,३०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com