भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या : शरद पवार

भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या : शरद पवार
भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या : शरद पवार

बीड : आम्ही विविध भागात औद्योगिक वसाहती आणि उद्योग उभारून रोजगार दिले. शेतकऱ्यांसाठी सर्वांत मोठी कर्जमाफी केली. परंतु भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढत असून, उद्योग बंद पडून बेरोजगारीदेखील वाढत आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कााँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. १६) आयोजित सभेत पवार बोलत होते. माजी मंत्री सुरेश नवले, उमेदवार संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, सय्यद सलिम, सुनील धांडे, उषा दराडे, सिराज देशमुख या वेळी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘आम्हाला चार वेळा मुख्यमंत्रिपद, कृषिमंत्रिपद, संरक्षण मंत्रिपद अशा विविध जबाबदाऱ्या दिल्या. आता नवीन नेतृत्वाची पिढी तयार करून त्यांना मार्गदर्शन करायचे आहे. बीडमध्ये नव्या नेतृत्वाला पसंती असल्याचे चित्र आहे. ’’ 

आपण मंत्रिपदांसारख्या संधी दिल्या. परंतु सर्व काही मिळूनही दुसरी पिढी सोडून जात असल्याचा टोला पवार यांनी नाव न घेता शिवसेनेत गेलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना लगावला. जीव गुदमरला म्हणून पक्षांतर केले म्हणता. मग, १५-२० वर्षे सत्तेची उब आल्याने जीव गुदमरला का, असा सवाल करत सारखं कुंकू बदलायचं नसतं, घरोबा एकदाच करायचा असतो, कुंकू बदललं की समाजात काय म्हणतात हे न बोललेलंच बरं असा टोला पवार यांनी लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com