कानळदा, नांद्रा बुद्रुक भागात किसान सन्मान योजनेबाबत शेतकऱ्यांची तक्रार

कानळदा, नांद्रा बुद्रुक भागात  किसान सन्मान योजनेबाबत शेतकऱ्यांची तक्रार
कानळदा, नांद्रा बुद्रुक भागात किसान सन्मान योजनेबाबत शेतकऱ्यांची तक्रार

जळगाव  ः कानळदा, नांद्रा बुद्रुक, खेडी खुर्द (ता.जळगाव) भागात अनेक शेतकऱ्यांना अजूनही किसान सन्मान योजनेतून प्रतिमहिना ५०० रुपये निधी मिळत, नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी तलाठी व तहसील कार्यालयात सतत चकरा मारत आहेत. परंतु, तलाठी व कर्मचारी दाद देत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  या भागातील किमान ३० टक्के शेतकरी या निधीपासून वंचित आहेत. मध्यंतरी आधार क्रमांक, बॅंक खाते क्रमांक दुरुस्तीच्या सूचना प्रशासनाने दिल्या. यानंतर अनेक शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात आपले आधार कार्ड, बॅंक खाते क्रमांक (आयएफएससी कोड) सादर केले. परंतु, ही माहिती पुढे तहसीलदार कार्यालयात पोहचलेली, नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.  तहसील कार्यालयात गेल्यास तेथे कर्मचारी दाद देत नाहीत, तलाठी तहसीलदार कार्यालयात संपर्क करा, असे सांगतात. यामुळे शेतकऱ्यांना मनःस्ताप होत आहे. काही शेतकऱ्यांना हा निधी मिळाला, तर अनेक शेतकरी वंचित असल्याने नेमका घोळ तहसीलदार कार्यालयाने केला की, तलाठ्यांनी कामात कसूर केली आहे, याची चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात आहे. कानळदा येथे तलाठी कार्यालयात काही शेतकऱ्यांनी या समस्येबाबत सांगितले. परंतु, याबाबत संबंधित लक्ष देत नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  जळगाव ग्रामीणमधून अलीकडेच आमदार म्हणून निवडून आलेले गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेकदा शिंगाडा मोर्चे काढले, आता या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आपल्या अधिकारांचा उपयोग करावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com