पुणे ः पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने परिपत्रक जारी करून शेतकऱ्यांना पिककर्ज भरण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याचे म्हटले आहे. परंतु या परिपत्रकात जे शेतकरी ३१ मार्चपर्यंत कर्ज भरतील. त्यांनाच सवलत लागू होईल, असे म्हटले आहे. तसेच जे शेतकरी जून अखेरीस कर्ज भरतील त्यांना संपूर्ण व्याज सवलत मिळणार किंवा कसे याबाबत काहीच स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा संभ्रम वाढला आहे. सर्वत्र संचारबंदी असल्याने ३१ मार्च अखेरपर्यंत पिककर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. त्यातच कर्ज भरण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय रिझर्व बँकेने घेतला असल्याने शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला होता. परंतु रिझर्व बँकेचा निर्णय सहकारी बँकांना लागू नसल्याचे कारण देत पीडीसीसीने बँकेने ३१ मार्च पर्यंतच कर्ज भरावे लागेल असे म्हटल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला होता. पंरतु बॅंकेने निर्णय घेतल्याने त्यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. मात्र, या परिपत्रकात पीक कर्जाच्या व्याजाच्या सवलतीत स्पष्टपणे कुठलीही सूचना दिलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे, अशी माहिती जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी दिली. शेतकऱ्यांमध्ये झालेले संभ्रमाविषयीची मुद्दे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.