‘गोसेखुर्द’च्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे धरणे

‘गोसेखुर्द’च्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे धरणे
‘गोसेखुर्द’च्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे धरणे

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठी भंडारा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी धारगाव येथे धरणे दिले. धारगाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द हा विदर्भातील सर्वांत मोठा सिंचन प्रकल्प आहे. त्याअंतर्गत चार उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या आहेत. परंतु, भंडारा तालुक्‍यातील धारगाव, आमगाव, शिंगोरी, भिलेवाडा आणि इतर भागात या प्रकल्पाचे पाणी पोचलेच नाही. परिणामी, हंगामात नापिकीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. उत्पादकतेवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे बारमाही सिंचन सुविधेची शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी धारगाव सिंचन योजना कार्यान्वित व्हावी, म्हणून शेतकरी काही वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत.

माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीदेखील त्यासाठी प्रयत्न केले. परंतु, योजना मार्गी लागली नाही. त्यामुळे धारगाव उपसा सिंचन संघर्ष समितीच्या नेतृत्वात सोमवारी (ता. २५) धरणे देण्यात आले. या आंदोलनात भोंडेकर, संजय रेहपाडे, अनिल गायधने, उमेश सार्वे, जनराम मस्के यांच्यासह शेतकरी सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com