पंचनाम्यात वेळ घालवण्यापेक्षा सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी

पीक नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री रामदास कदम
पीक नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री रामदास कदम

बिलोली, जि. नांदेड : पावासामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तत्काळ सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली.

पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी (ता. ३) नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. लोहगाव (ता. बिलोली) येथे सकाळी साडेनऊ वाजता अशोक वानोळे यांच्या शेतातील पीक नुकसानीची पाहणी केली. या वेळी आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, उपजिल्हाधिकारी डॉ. शरद झाडके, नायब तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड आदी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर मुखेड नायगाव यांसह सर्वच तालुक्यांतील सोयाबीन कापूस, ज्वारी आदी पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. बहुतांश भागातील सोयाबीनला ठिकाणी मोड फुटले असून, मराठवाडा तेलंगणा सीमेलगत असलेल्या सीमावर्ती भागात भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकाचे प्रचंड नुकसान झाले असतानाही पंचनामे करण्यात वेळ मारून नेण्यापेक्षा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी लोहगाव येथील उपस्थित शेतकऱ्यांनी पालकमंत्री कदम आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com