टेंभूचे आवर्तन सुरू करा, अन्यथा आंदोलन 

रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचे आवर्तन तत्काळ सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा तालुक्‍यातील टेंभूच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
टेंभूचे आवर्तन सुरू करा, अन्यथा आंदोलन 

कडेगाव, जि. सांगली : रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचे आवर्तन तत्काळ सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा तालुक्‍यातील टेंभूच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे. तालुक्‍यात या वर्षी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे तालुक्‍यातील भूजल पातळीत मोठी वाढ झाली होती. परंतु आता रब्बी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात विहिरी व कूपनलिकांतून उपसा होत आहे. त्यामुळे पुन्हा विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. परिणामी, आता पिकांना पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे. 

तालुक्यातील रब्बी हंगाम चांगलाच बहरला असून, तालुक्‍यात ११ हजार ९१२ हेक्‍टर इतके सरासरी क्षेत्र आहे. तर उसाचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे रब्बी व ऊस यासह अन्य पिकांना आता पाण्याची आवश्‍यकता आहे. काही ठिकाणी पाण्याअभावी पिके वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

दरम्यान, कडेगाव तालुक्यासह टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभ पाणीटंचाई भासू लागली आहे. तेव्हा रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचे आवर्तन तत्काळ सुरू करावे, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. अन्यथा, पाण्यासाठी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही टेंभूच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे.  प्रतिक्विंटल टेंभू योजनेचे रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू करण्याची कार्यवाही सुरू असून, पुढील आठवड्यात आवर्तन सुरू होईल. परंतु शेतकऱ्यांनी पाण्यासाठी लेखी मागणी करावी. तसे केल्यास मागणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन करणे सोपे होईल.  - नरेंद्र घार्गे, सहायक कार्यकारी अभियंता, टेंभू योजना 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com