मंगळवेढा तालुक्‍यात माहितीअभावी शेतकरी भरपाईपासून वंचित

बाजरी, तूर, सूर्यफुलाचा विमा भरला. बाजरी व सूर्यफुलाची भरपाई मिळाली. तुरीची मिळाली नाही. ड्रायव्हर असल्यामुळे जादा क्षेत्रातून वगळण्यात आल्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे तक्रार दाखल करता आली नाही. त्यामुळे तूर पिकाच्या भरपाईपासून वंचित राहावे लागले. वास्तविक एकूण क्षेत्र आणि विमा संरक्षित क्षेत्राचा विचार करता हे क्षेत्र जादा होत नाही. तरीही विमा कंपनीने मला वगळले. - तुकाराम व्हरगर, शेतकरी दाखल एक हजार ५२१ प्रस्ताव छाननी करून वरिष्ठ कार्यालयाला सादर केले आहेत. वरिष्ठांची मंजुरी येताच या लाभार्थींना रक्कम त्यांच्या बॅंक खात्यांवर जमा करण्यात येईल. - बसवराज करपे, मंडल प्रबंधक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, सोलापूर
मंगळवेढा तालुक्‍यात माहितीअभावी शेतकरी भरपाईपासून वंचित
मंगळवेढा तालुक्‍यात माहितीअभावी शेतकरी भरपाईपासून वंचित

मंगळवेढा, जि. सोलापूर : दुष्काळ आणि पावसाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले. तोच खरीप हंगाम २०१८ मधील दोन हजार ४९१ शेतकऱ्यांवर माहितीअभावी नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तक्रार अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांनादेखील दोन महिने झाले, अद्याप भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. 

पीकविम्यात होत असलेला गैरप्रकार लक्षात घेऊन केंद्र शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना या संकेतस्थळावर खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. २०१८ च्या खरीप हंगामात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे तालुक्‍यातील विमाधारक शेतकऱ्यांना बाजरी व सूर्यफुलाचा विमा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आठ महिन्यांत मिळाला. परंतु, याच हंगामातील तालुक्‍यातील १६ हजारांपेक्षा अधिक तूर उत्पादक शेतकरी वंचित आहेत. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला शिवसेनेने मुंबईत केलेले आंदोलन व आमदार भारत भालके यांची लक्षवेधी, शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनानंतर विमा कंपनीने तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी २३ हजार ९१० रुपये इतकी भरपाई त्यांच्या बॅंक खात्यांवर जमा केली. परंतु, यामधील जादा क्षेत्राच्या नावाखाली चार हजार १२ तूर उत्पादक शेतकरी वगळण्यात आले. त्याच हंगामात बाजरी व सूर्यफुलाची भरपाई देऊन तुरीची भरपाई देताना जाणून-बुजून वगळण्यात आले.

क्षेत्र जादा होत नसल्याचे पुरावे म्हणून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या सोलापूर येथील कार्यालयात विम्याचे प्रस्ताव, सातबारा, बॅंक पासबुक आणि शेतकऱ्यांचा अर्ज दाखल केला. त्यापैकी या सर्व एक हजार ५२१ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. परंतु, उर्वरित २४९१ शेतकऱ्यांना या संपूर्ण प्रकाराची माहितीच नसल्याने तुरीची भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com