सांगलीतील ५७ हजार शेतकरी पीकविमा भरपाईपासून वंचित

गेल्या वर्षी खरीप हंगामात चार एकर सोयाबीन पेरले होते. कमी पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. पीकविमा घेऊन सोयाबीनला संरक्षित केले होते. मात्र, अद्यापही पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. - संजय पाटील, पाटगाव, ता. मिरज.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप २०१७ मध्ये जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ५२४ शेतकरी सहभागी झाले. यापैकी ५८ हजार ५७७ शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून २२ कोटी ७९ हजार विमा नुकसानभरपाई मिळाली आहे. मात्र, अद्यापही ५७ हजार ९४७ शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. यामुळे शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पीकविमा नुकसानीबाबत कृषी विभागाने दुर्लक्ष केले आहे.

खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली. जिल्ह्यातील शेतकरी या योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती देखील केली. यामुळे जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ५२४ कर्जदार आणि बिगरकर्जदार असे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतला. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी ३ कोटी ३९ लाख ९४ हजार लाख रुपये भरले आहेत. ही रक्कम गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संबंधित विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या योजनेतून  ५८ हजार ५७७ शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून २२ कोटी ७९ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहे. उर्वरित ५७ हजार ९४७ शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हा कृषी विभागाचे दुर्लक्ष पीकविम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही, अशी तक्रार झाल्याने त्यामुळे बॅंकेने कृषी आयुक्तालयाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामध्ये ३० ऑगस्ट २०१८ ला पीकविमा कंपनीस नुकसानभरपाई कृषी आयुक्त कार्यालयाने सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्यापही पीकविमा कंपनीने कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे कृषी विभागाने उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाईसाठी कार्यवाही करावी, अशी बॅंकेने मागणी केली आहे. मात्र, याबाबत कृषी विभागाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे पीकविम्याची नुकसानभरपाईची रक्कम अडकून राहिली आहे.

विमा कंपनीकडून रक्कम वर्गच नाही पीक विम्याची रक्कम बॅंकेत जमा झाली आहे. याची खातरजमा करण्यासाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे. पीकविम्याची रक्कम अद्यापही आलेली नाही. चार दिवसांनी या असे सांगितले जाते, तर काही बॅंकेतील अधिकारी सांगतात, की विमा कंपनीकडे पैसे उपलब्ध नसल्याने त्यांनी रक्कम जमा केली नाही. त्यामुळे रक्कम कधी वर्ग होणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.

पंतप्रधान पीकविमा योजना घेऊन सोबाबीन पिकाला संरक्षण दिले होते. वेळेत पाऊस झाला नाही त्यामुळे पिकाचे नुकसान झाले. पीकविम्याची रक्कम खात्यावर जमा झाली आहे, यासाठी सातत्याने हेलपाटे मारतोय. मात्र, बॅंकेतील अधिकारी सांगतात, की विमा कंपनीकडे पैसे उपलब्ध नसल्याने त्यांनी रक्कम जमा केली नाही, असे पाटगाव (ता. मिरज) येथील शेतकरी भागवत पाटील यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com