डाळिंबाच्या विम्याचे पैसे वर्षानंतरही मिळाले नाहीत 

आमच्या गावातील बँक ऑफ इंडिया; तसेच इतर बँकांकडे भरलेल्याचे पैसे जमा झाले; पण माझे लक्ष्मी दहिवडी डीसीसी बँकेकडे भरलेल्या पीकविम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. - बाळकृष्ण सुडके, शेतकरी, महमदाबाद (शे), जि. सोलापूर
pomegranate
pomegranate

मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील ६७० शेतकऱ्यांना सुमारे १ कोटी ८० लाखांची भरपाई विमा कंपनीने मंजूर केली; पण यंदा दुसऱ्या वर्षीचा विमा भरण्याची वेळ आली. कंपनीकडून अद्यापही हे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. याबाबत पाठपुरावा करूनही कृषी विभाग वा विमा कंपनी कोणीच याबाबत दाद देत नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

गतवर्षीच्या खरीप हंगामात हवामानावर आधारित फळपीक विम्यातून डाळिंब पिकासाठी तालुक्यातील सात महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांनी विमा भरला. त्यामधील मंगळवेढा, मरवडे, भोसे या महसूल मंडळांमधील जवळपास ६७० शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करूनही ती दिली गेली नाही. त्याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला; पण त्याची दखल कोणत्याच पातळीवर घेतली नाही. पावसाचे प्रमाण आणि त्या वेळच्या हवामानातील बदलाची विविध तांत्रिक कारण देत ही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. तांत्रिक अडचणीमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकच पैसे मिळतील, असे बजाज इन्शुरन्स कंपनीचे देवा कोळी यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com