अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब, देशपांडे राजघाटावर

अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब, देशपांडे राजघाटावर
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब, देशपांडे राजघाटावर

नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि शेतकरी विरोधी कायद्यांच्या प्रश्नी आज (ता.१९) देशासह परदेशातही अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ झाला आहे. दिवसभर हा उपवास केला जाणार असून किसान आंदोलनाचे नेते अमर हबीब आणि शेतकरी संघटनेचे नेते अनंत देशपांडे यांनी येथील राजघाटावरील महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन एकदिवसीय अन्नत्यागास प्रारंभ केला. 

चिलगव्हाण येथील रहिवासी साहेबराव करपे यांनी कर्जबाजारीपणा, दुष्काळीस्थितीला कंटाळत १९ मार्च १९८६ रोजी आपले जीवन संपविले होते. वर्धा जिल्ह्यातील पवनार आश्रमालगतच्या दत्तपूर येथे त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती. राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून ओळखली जाते. या शेतकरी कुटुंबाला श्रद्धांजली म्हणून दरवर्षी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन राज्यभरात केले जाते. 

या आंदोलनाबाबत बोलताना श्री. हबीब म्हणाले,''मी आणि अनंत देशपांडे सकाळी महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी राजघाट येथे आलो आहोत. शेतकरी आत्महत्यांचे दु:खाची जाणिव करून देण्यासाठी नाही, तर या दु:खातून मुक्ती मिळविणे आणि शेतकरी विरोधी कायदे समाप्त करणे याकरिता आपला निश्चय दृढ आम्ही येथे उपवास करताना करणार आहोत.''

''आज संपूर्ण महाराष्ट्रात लाखो किसानपुत्र आणि शेतकरी अन्नत्याग आंदोलनात सहभागी होत आहेत. देशासह विविध राज्यात आणि परदेशातही हजारो शेतकरी पुत्र आज अन्नदात्याच्या सलामतीसाठी उपवास करत आहेत. आज दिवसभर आम्ही राजघाटवर उपवास करणार आहोत,'' अस श्री. हबीब म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com