माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर करावा. दुष्काळी अनुदानाची रक्कम तत्काळ खात्यावर जमा करावी, शेतकऱ्यांना पेरणीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, आदी मागण्यांसाठी माळाकोळी परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १८) अर्धनग्न मोर्चा काढला. माळाकोळी ते लोहा तहसील कार्यालय असे १३ किलोमीटर अंतर चालत जाऊन हा मोर्चा काढण्यात आला.
लोहा आणि कंधार तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना खर्चापेक्षा कमी उत्पादन झाले. शेतीमालाला भावही मिळाला नाही. यामुळे या भागातील शेतकरी कर्जबाजारी झाले. पिकविमा परतावा, दुष्काळी अनुदान लाभापासून लोहा कंधार तालुक्याला वगळण्यात आले. त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला.
माऊली गिते, अॅड गणेश नागरगोजे, कालीदास मुस्तापुरे, शामसिंह बयास, दत्ता चाटे , सतिश कुलकर्णी, नारायण नागरगोजे, नामदेव कारेगावकर, पांडुरंग नीगरगेजे, नरेंद्र बल्लोरे, विलास केंद्रे, रंगनाथ केंद्रे, बाबुराव मुस्तापुरे, बालाजी तिडके, अनिल तिडके, सोहम गहेरवार आदीसह शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.