सरकारसह विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची निराशा

केंद्र व राज्य शासनासह विमा कंपन्यांनी ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मोठी निराशा झाली आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
Farmers frustrated by insurance companies, including the government
Farmers frustrated by insurance companies, including the government

रिसोड, जि. वाशीम : केंद्र व राज्य शासनासह विमा कंपन्यांनी ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मोठी निराशा झाली आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. रिसोड तालुक्यातील वाकद येथे गुरुवारी (ता. ११) रात्री झालेल्या कापूस-सोयाबीन परिषदेत ते बोलत होते. या वेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 

परिषदेच्या व्यासपीठावर शेट्टी यांच्यासह रविकांत तुपकर, दामोदर इंगोले, पवन देशमुख, बालाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजू शेट्टी म्हणाले, ‘‘केंद्र शासनाने सोयापेंड आयात करून तसेच पाम तेलावरील निर्बंध उठवून सोयाबीनचे भाव निम्म्यापेक्षाही कमी केले. अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनची नासाडी झाली तरीही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत विमाभरपाई दिलेली नाही. राज्य शासनाचे विमा कंपन्यांना अभय आहे.

केंद्र व राज्य शासन आणि विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ऐन रब्बी हंगामात वीज जोडण्या तोडल्या जात आहेत. सक्तीची वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांना कोंडीत पकडले जात आहे. त्यामुळे वज्रमूठ करून एकत्र घेऊन शासनाला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com