उत्तुरमध्ये चिकोत्रा गटामार्फत भाजीपाला पुरवठा सुरु 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत उत्तुर येथे चिकोत्रा सेंद्रिय शेतमाल शेतकरी उत्पादक गटामार्फत भाजीपाला पुरवठा नुकताच सुरु करण्यात आला.
farmer market
farmer market

कोल्हापूर: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत उत्तुर येथे चिकोत्रा सेंद्रिय शेतमाल शेतकरी उत्पादक गटामार्फत भाजीपाला पुरवठा नुकताच सुरु करण्यात आला. 

राज्यात व देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून सरकारने संचारबंदी लागू केली आहे. या काळात नागरिकांना जीवनावश्यक मालाचा तुटवडा भासू नये यासाठी अत्यावश्यक पावले शासकीय यंत्रणा उचलत आहे. कृषी विभाग व आत्मा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या चिकोत्रा सेंद्रिय भाजीपाला शेतमाल शेतकरी उत्पादक गट झुलपेवाडी यांनी आजरा तालुक्यातील गावांमध्ये भाजीपाला पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून उत्तुरयेथे विक्री केंद्र सुरू करण्यात आले. 

नागरिकांना लॉकडाउनच्या काळात भाजीपाला तुटवडा होऊ नये यासाठी हा उपक्रम कृषी विभाग व आत्मा मार्फत राबविणेत येत आहे. यामध्ये वांगी, टोमॅटो, कारली, शेवगा, कोबी पालेभाज्या इत्यादी सर्व भाजीपाला विक्रीसाठी सुरु करण्यात आलेला आहे. 

यावेळी मंडळ कृषी अधिकारी जी. व्ही. पाटील, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा अमित यमगेकर, कृषी सहाय्यक एस. बी. गडकरी, के. एच. उगले, विक्री केंद्र संचालक प्रकाश रावण, गटाचे अध्यक्ष उद्धव माने, धोंडीराम माने, रणधीर माने उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com