मराठवाड्यात ३० टक्के कापूस शिल्लक 

आमच्या गावात किमान २ हजार क्विंटल कापूस विक्रीविना पडून असेल. माझ्या एकट्याकडेच १४५ क्विंटल कापूस विकणे बाकी आहे. दरवर्षी पाडव्यानंतर कापूस विकायचो त लॉकडाऊन झाल. तसाही वेचणीच्या दरानं न परवडलेला कापूस आता विक्रीच्या संकटांत सापडलाय. सरकारनं निदान हा हमी दरानं विकला जाईल अशी सोय करावी. - मुंजाभाऊ कदम, कापूस उत्पादक, कोथरूळ, जि. बीड.
मराठवाड्यात ३० टक्के कापूस शिल्लक 
मराठवाड्यात ३० टक्के कापूस शिल्लक 

औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, या कापूस बहुल जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जवळपास २५ ते ३० टक्के कापूस विक्रीविना पडून आहे. लॉकडाऊन नंतर कापसाला खरेदीदार मिळेनासा झाला आहे.आधीच उत्पादन खर्चाला न परवडलेला कापूस विकला जाईल की नाही असा प्रश्न कापूस उत्पादकांना पडला आहे.  मराठवाड्यात जवळपास १४ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यामध्ये सर्वाधिक जवळपास सव्वाचार लाख हेक्टर औरंगाबाद जिल्ह्यात, पावणेतीन लाख हेक्‍टर जालना जिल्ह्यात तर जवळपास पावणेचार लाख हेक्टर बीड जिल्ह्यात होते. सुरुवातीला पाऊस नसल्याने संकटात सापडलेले कापसाचे पीक ऑक्टोबरच्या मध्यानंतर सुरू झालेल्या अवेळी व अवकाळी पावसाच्या संकटात सापडले. प्रतिकूल परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात नेहमीच्या तुलनेत मोठी घट झाली. कोरडवाहू कापूस पिकात ती अधिक होती. त्यानंतर कापूस वेचण्याच्या प्रचंड वाढलेल्या दराने कापूस उत्पादकांना अडचणीत आणल. सुरुवातीला ८ ते १० रुपये प्रतिकिलो असणारे दर शेवटी १५ रुपये प्रतिकिलोपर्यंत गेल्याचे कापूस उत्पादक सांगतात.  उत्पादनात घट झाली असताना विक्री प्रक्रिया सुरू झाली तर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन ने कापसाच्या हमी दराने खरेदीला ब्रेक लावला. सामान्यतः बहुतांश जिनिंगमध्ये काम करणारे मजूर हे मध्यप्रदेश वा आंध्र प्रदेश मधील होते. हे सर्वच मजूर निघून गेल्याने त्याचा खरेदी प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. कापूस पणन महासंघाच्या औरंगाबाद विभागांतर्गत एका जिनिंग मधील जवळपास एक हजार क्विंटल कापसावर प्रक्रिया होणे बाकी आहे. याशिवाय जवळपास २१हजार कापूस गाठी जिनिंग मधून गोडाऊन वर हालविण्याची प्रक्रियाही नियमांच्या अधीन असल्याने अत्यंत संथगतीने सुरू आहे. खासगीत कापूस खरेदी करणारे पाच हजाराच्या आतच प्रतिक्विंटल दराने कापूस मागत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे आधीच उत्पादकतेत फटका देणारा कापूस किमान हमी दराने विकला जातो की नाही तशी व्यवस्था शासन तत्काळ सुरु करते की नाही असा प्रश्न कापूस उत्पादकांना पडला आहे.  प्रतिक्रिया यंदा गतवर्षीच्या तुलनेत १५ क्विंटल कापूस कमी झाला. २० क्विंटल खासगीत ४७०० रुपये प्रतिक्विंटल ने विकला. तीस क्विंटल घरात पडून आहे. होळीपासून हमी दर खरेदी थांबली त्यामुळे कापूस विकला जातो की नाही असा प्रश्न पडलाय.  - रवींद्र जाधव, कापूस उत्पादक, निंबायती, जि, औरंगाबाद 

लॉकडाऊन झाल्यापासून कुणी कापूस घ्यायला फिरकेना. माझा १५ क्विंटल तर माझ्या भावाचाही बऱ्यापैकी कापूस घरात विक्री अभावी पडून आहे. आमच्या गावात किमान २० टक्के कापूस विक्री शिल्लक असेल.  - तुकाराम धानूरे, कापूस उत्पादक, बोधलापुरी, जि. जालना. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com