वानचे पाणी रोखण्यासाठी शेतकऱ्यांची मुंबईला धडक 

जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या वान प्रकल्पातील पाणी रोखण्यासाठी या तालुक्यातील शेतकरी पुढे आले आहेत. शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले असून, जलसंपदामंत्री, पालकमंत्री तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.
वानचे पाणी रोखण्यासाठी शेतकऱ्यांची मुंबईला धडक  Farmers hit Mumbai to stop Wan's water
वानचे पाणी रोखण्यासाठी शेतकऱ्यांची मुंबईला धडक  Farmers hit Mumbai to stop Wan's water

अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या वान प्रकल्पातील पाणी रोखण्यासाठी या तालुक्यातील शेतकरी पुढे आले आहेत. शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले असून, जलसंपदामंत्री, पालकमंत्री तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन पाणी थांबविण्यासाठी विनंती करणार आहेत. दरम्यान, वानचे पाणी रोखण्यासाठी या भागात पाणी बचाव संघर्ष समिती निर्माण झाली आहे. ही समिती तीन जानेवारीपासून थेट प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन करणार आहे.  अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील शेती पाण्याखाली आणण्याच्या उद्देशाने सातपुड्यात वान प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सिंचन सुविधा निर्माण होतील, अशी अपेक्षा असतानाच दुसरीकडे मात्र दर वर्षी विविध योजनांसाठी पाणी पळविले जात असल्याची शेतकऱ्यांमध्ये भावना तयार झाली आहे.  आजवर अनेक योजनांसाठी पाणी आरक्षित केले आहे. आता पुन्हा एकदा अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघातील ६९ गावांसाठी पाणी आरक्षित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांमधून विरोध वाढलेला आहे. आता अकोल्याच्या अमृत योजनेसाठी २४ दलघमी व बाळापूरच्या योजनेसाठी ३.३५ दलघमी पाणी आरक्षित करण्याचा शासन निर्णय निघाला आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा व धरणातील पाणी तालुक्यातील शेतीचे सिंचनासाठी आरक्षित करण्यात यावे या बाबत तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले आहे. तेथे पाणी पुरवठामंत्री, जलसंपदामंत्री व पालकमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांवर कसा अन्याय होत आहे या बाबत आपली बाजू मांडणार आहेत. 

असा आहे प्रकल्प  अकोला-बुलडाणा-अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर हा प्रकल्प आहे. तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचन व्हावे यासाठी हा प्रकल्प साकारला आहे. यातून सिंचनाशिवाय बिगर सिंचनासाठी अधिक पाणी आरक्षित झालेले आहे. त्यामुळे शासन निर्णय रद्द व्हावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध वान पाणी बचाव संघर्ष समितीने तीन जानेवारीपासून वान धरणावर बेमुदत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मुंबईत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन वानच्या पाण्यासंदर्भात सिंचनाबाबत या भागातील शेतकऱ्यांवर कसा अन्याय होत आहे, या संदर्भात आपली बाजू मांडणार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com