खानदेशात भारनियमन, खंडित विजेमुळे शेतकरी त्रस्त

खानदेशातील शेतकरी भारनियमन, खंडित विजेमुळे त्रस्त
खानदेशातील शेतकरी भारनियमन, खंडित विजेमुळे त्रस्त

जळगाव : सध्या भारनियमन, खंडित वीज आणि रोहित्रांमधील बिघाडामुळे खानदेशातील ग्रामस्थ, शेतकरी त्रस्त झाले आहेत. नादुरुस्त रोहित्राच्या दुरुस्तीसाठी वीज कंपनीचे अधिकारी थेट पूर्ण बिल भरा अन्यथा दुरुस्तीच करणार नाही, अशी अडवणूक करीत आहेत.

कंपनीकडून २४ तास वीजपुरवठा देण्याचा दावा करण्यात येत असला तरी रोज दोन ते तीन तास वीज बंद असते. सूचना न देता गावांमधील वीजपुरवठा बंद केला जातो. विचारणा केल्यास दुरुस्ती सुरू असल्याचे सांगण्यात येते. किरकोळ पाऊस झाला तरी रात्रभर वीजपुरवठा बंद करण्यात येतो. आता कडक ऊन पडत असल्याने शेतकरी कृषिपंप सुरू करीत आहेत. परंतु दिवसा फक्त चार ते पाच तास वीज मिळते. अनेक ठिकाणी रोहित्र, नादुरुस्त तारा, वाहिन्या अशी समस्या आहे.

धुळे तालुक्‍यातील कापडणे येथे कांदा, कापूस व इतर पिकांची शेती आहे. परंतु नादुरुस्त रोहित्रामुळे कृषिपंप सुरू करता येत नव्हते. शेतकऱ्यांनी ही समस्या वीज कंपनीला सांगितली. मात्र वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजबिल भरा, असे सांगून शेतकऱ्यांना परतावून लावले. शेवटी शेतकऱ्यांना थेट शेतात वीज कंपनीच्या विरोधात आंदोलन करावे लागले.

जळगाव तालुक्‍यातील फुपनगरी येथे रोहित्रातील बिघाडामुळे गणपती विसर्जनाच्या दिवशी वीजपुरवठा बंद झाला. तो दुरुस्त करण्यासाठी ग्रामस्थ व इतरांनी वीज कंपनीकडे संपर्क साधला. पण तीन दिवस दुरुस्तीच झाली नाही. असेच प्रकार इतर भागातही सुरू असून, वीजपुरवठा मध्येच खंडित होत असल्याने कृषिपंप जळत आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी चार ते पाच हजारांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com