खानदेशात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

यंदा अतिपावसात सर्वच पिकांची अतोनात हानी झाली आहे. उत्पादन हाती आलेच नाही. दुसरीकडे शासनाने फळ पिके किंवा बहुवार्षिक पिके वगळता इतर पिकांच्या नुकसानीसाठी तोकडी १० हजार रुपये प्रतिहेक्टर, अशी मदत जाहीर केली. ही मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल, अशी बतावणी केली जात होती. परंतु अद्यापही ही मदत शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही.
Farmers in Khandesh waiting for help
Farmers in Khandesh waiting for help

जळगाव ः यंदा अतिपावसात सर्वच पिकांची अतोनात हानी झाली आहे. उत्पादन हाती आलेच नाही. दुसरीकडे शासनाने फळ पिके किंवा बहुवार्षिक पिके वगळता इतर पिकांच्या नुकसानीसाठी तोकडी १० हजार रुपये प्रतिहेक्टर, अशी मदत जाहीर केली. ही मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल, अशी बतावणी केली जात होती. परंतु अद्यापही ही मदत शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही.

कापूस, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांची मोठी हानी झाली आहे. खानदेशात कापसाचेच सुमारे अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघालेला नाही. अतिपावसात उडीद, मुगाची तर मळणीदेखील अनेक शेतकरी करू शकले नाहीत.

पंचनामे व मदतीसंबंधी शेतकरी ऑगस्टपासून मागणी करीत होते. परंतु शासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. उडीद, मुगाचेच पंचनामे झाले. नंतर पंचनामे झालेच नाहीत. शेतकऱ्यांसह इतर संघटनांनी हेक्टरी किमान २५ हजार रुपये मदत मिळावी व फळ, बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळण्याची मागणी केली होती. शासनाने उशिरा मदत जाहीर केली. तीदेखील तोकडीच आहे. हेक्टरी सरसकट १० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. ही मदत दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा अनेक मंत्र्यांनी केली होती. परंतु ही मदत अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्राप्त झालेली नाही. काही भागात तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी देखील तयार झालेली नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

बोंड अळीचे पंचनामे करा युती सरकारने गुलाबी बोंड अळीसंबंधी स्वतंत्र पंचनामे करून मदत दिली होती. यंदा तर गुलाबी बोंड अळीने कापूस पीक हातचे गेले. परंतु याबाबत पंचनामेच यंदा झालेले नाहीत. मदतीबाबत ब्र शब्दही कुठे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधींनी काढलेला नाही, अशी नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पिकांची अतोनात हानी झाली. कापूस हे प्रमुख पीक आहे. ते अतिपावसानंतर गुलाबी बोंड अळीने पुरते हातचे गेले. शासन दिवाळीलाच हेक्टरी १० हजार व बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार मदत देणार होते. परंतु ही मदत कुठेही शेतकऱ्याला मिळालेली नाही. - संजय चौधरी, शेतकरी, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com